Advertisement

“आम्ही ५० थरांची हंडी फोडली”, एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी

असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले.

“आम्ही ५० थरांची हंडी फोडली”, एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी
SHARES

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, “दहीहंडी आणि नवरात्रोउत्सवाच्या माध्यमातून आनंद दिघे यांनी आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे काम केले असून तेच काम आजही सुरू आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांची बहीण अरुणाताई यांनी ही बाब मला बोलून दाखवली होती. दिघे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी मुख्यमंत्री म्हणून इथे उपस्थित राहलो, हे माझे भाग्य समजतो.”

तसेच, “गोविंदाना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोकप्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल, असेही ते म्हणाले.

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला.

“टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावले असून त्याचा मला अभिमान आहे.” तिने सांगितले.



हेही वाचा

सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालत असेल : बाळासाहेब थोरात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा