मुस्लिम धर्मातील तिहेरी तलाक पद्धतीला 6 महिन्यांपर्यंत स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या सहा महिन्यांत सरकारने संसदेत यावर कायदा करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
11 ते 18 मे पर्यंत तिहेरी तलाक मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ज्यानंतर 22 अॉगस्टपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीशांनी तिहेरी तलाक पद्धतीला घटनाबाह्य ठरवत यावर बंदी घालावी असा निर्णय सुनावला. तसेच कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
उत्तराखंडमधील सायरा बानो या महिलेने तिहेरी तलाक पद्धतीविरोधात याचिका दाखल केली होती. पण अखेर 22 ऑगस्टला याचिकाकर्त्यांच्या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने तलाक पद्धतीवर बंदीचा निर्णय दिला आहे.
What's your reaction to the https://twitter.com/hashtag/TripleTalaq?src=hash">#TripleTalaq decision? Vote....https://twitter.com/hashtag/TripleTalaqOver?src=hash">#TripleTalaqOver https://twitter.com/hashtag/TripleTalaqVerdict?src=hash">#TripleTalaqVerdict https://twitter.com/hashtag/TripleTalaqSeAazadi?src=hash">#TripleTalaqSeAazadi
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) https://twitter.com/MumbaiLiveNews/status/899899594372296704">August 22, 2017
हेही वाचा -
केंद्र सरकारच्या तलाक सर्व्हेला विरोध
'या' मशिदीत महिलाही करतात कुराणाचे पठण