महाराष्ट्र दिनापासून म्हणजे एक मेपासून साईबाबांच्या शिर्डीत बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचं अनेकदा समोर आलं. त्यानंतर मंदिराला दुहेरी सुरक्षा पुरवण्यात आली. साई मंदिरात प्रस्तावित CISF सुरक्षेला ग्रामस्थांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आज विखे पाटलांची भेट घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोहचवणार आहे. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.
काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या?
हेही वाचा