Advertisement

उन्हाळी सुट्टी निमित्ताने ७८ विशेष गाड्या

उन्हाळी सुट्टी निमित्तानं कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

उन्हाळी सुट्टी निमित्ताने ७८ विशेष गाड्या
SHARES

उन्हाळी सुट्टी लागली की अनेक जण आपल्या गावी किंवा फिरायला जाणं पसंत करतात. त्यासाठी काहींनी तयारीलाही जोरदार सुरूवात केली आहे. उन्हाळ्यात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळं या प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून दरवर्षी विशेष गाड्या सोडण्यात येतात. त्यानुसार, यंदाही मध्य रेल्वेनं विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुट्टी निमित्तानं कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. एलटीटी - करमळी आणि सावंतवाडी, पनवेल-करमळी या दरम्यान गाड्या धावणार आहेत. उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी, पनवेल-करमळी आणि एलटीटी- सावंतवाडी दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - करमळी विशेष गाड्यांच्या २० फेऱ्या होणार आहेत.

०१०४७ ही रेल्वे ३ एप्रिल ते ५ जून दरम्यानदर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता सुटणार असून करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवाशांसाठी ०१०४८ ही रेल्वे ५ एप्रिल ते ७ जून दरम्यान दर रविवारी सकाळी ११ वाजता सुटणार असून एलटीटी रात्री १२.२० वाजता येणार आहे. या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविंम या स्थानकात थांबा दिला आहे.

पनवेल-करमळी रेल्वेच्या २० फेऱ्या होणार आहे. ०१०४९ रेल्वे ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर शनिवारी रात्री ९ वाजता निघणार असुन करमळीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवाशांसाठी ०१०५० ही रेल्वे ४ एप्रिल ते ६ जून दरम्यान दर शनिवारी सकाळी १०.४० वाजता सुटणार असून पनवेलला रात्री ८.१५ वाजता येणार आहे. या ट्रेनला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकात थांबा दिला आहे.

एलटीटी-करमळी ट्रेनच्या १८ फेऱ्या होणार आहेत. ०१०४५ रेल्वे १० एप्रिल ते ५ जून दरम्यानदर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार असून करमळीला दुपारी १२.२० वाजता पोहोचणार आहे. परतीकरिता ०१०४६ ही गाडी १० एप्रिल ते ५ जून दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता सुटणार असून एलटीटी रात्री १२.२० वाजता येणार आहे.

या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा असणार आहे. याशिवाय एलटीटी-सावंतवाडी ट्रेनच्या २० फेऱ्या होणार आहेत. ०१०३७ ही गाडी ६ एप्रिल ते ८ जून दरम्यान दर सोमवारी रात्री १.१० वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी १२.३० वाजता पोहोचणार आहे.

उन्हाळा सुट्टीत कोकणातील गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सुविधेसाठी ७८ एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक (३८ फेऱ्या), पनवेल-करमाळी साप्ताहिक (२० फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी (२० फेऱ्या) या मार्गावर विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. गुरुवार, २७ फेब्रुवारीपासून विशेष एक्स्प्रेसची आरक्षण खुले होणार आहे.



हेही वाचा -

गोरेगाव स्थानकातील 'हे' पूल दुरुस्तीसाठी बंद

या पोलिस अधिकाऱ्याचे कुख्यात गुंडाशी संबध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा