Advertisement

केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR टेस्ट बंधनकारक

केरळमधून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.

केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR टेस्ट बंधनकारक
SHARES

केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे. त्यामुळे केरळमधून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत.

आरटी-पीसीआर टेस्ट कोरोना रुग्ण शोधण्यासाठी केली जाते. यापूर्वी आरटी-पीसीआर टेस्ट गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अनिवार्य करण्यात आली होती.

केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं. सरकारचा आदेश रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गानं प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. महाराष्ट्रात हवाई मार्गानं दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.

याआधी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार, विमानात प्रवाशांना बसण्याची परवानगी देण्याआधी त्यांचे रिपोर्ट चेक करा, अशी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला विनंती केली होती. तर दुसरीकडे रेल्वे मार्गानं येणाऱ्या प्रवाशांकडे ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतात सर्वाधिक सक्रिय कोरोनाव्हायरसचे रुग्ण केरळात आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी जवळपास ४०% केरळ आणि २४% महाराष्ट्रातील आहेत.

अधिकाऱ्यानुसार, "खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्बंध लादले गेले आहेत."



हेही वाचा

कोव्हॅक्सीन लसीची चाचणी मुलांवरही होणार

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्चपासून सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा