मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्यात येणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ही विकासकामं रखडली आहेत. मागील २ वर्षांपासून प्रकल्पाबाबत चर्चा होत असतानाच आता विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.
स्थानकांतील प्रत्यक्षात कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होणार आहे. या स्थानकांत मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या तुलनेत उपनगरी स्थानकातील सुविधा अपऱ्या आहेत. अरूंद प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मवरील जागा अडवणारे स्टॉल यांमुळं प्रवाशांना चालणंही कठीण होतं. त्यात अपुरे पादचारी पूल, सरकते जिने, प्रसाधनगृहांची कमतरता व त्यांची स्वच्छता असे अनेक प्रश्न आहेत.
त्यामुळंच, एमआरव्हीसीमार्फत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह एकूण सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह ४ आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यांसह एकूण ८ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळं स्थानकांवर अनेक सुविधांची भर पडणार आहे. शिवाय, प्रकल्पाबाबत मागील २ वर्षांपासून चर्चा सुरू आहे.
प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी, तसेच नेमक्या कोणत्या सुविधा द्याव्यात इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी मार्च २०२० मध्ये सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे जारी झालेल्या लॉकडाऊनमुळं ही प्रक्रिया थंडावली. काही महिन्यांनी सल्लागार नेमल्यानंतर त्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. आता प्रत्येक स्थानकातील विकास कामांचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
'असा' होणार विकास
मध्य रेल्वे
हार्बर मार्ग
पश्चिम रेल्वे