Advertisement

मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून सुरू होणार?

चिपी विमानतळावरून विमान सेवा सुरळीत झाल्यास ऐन गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून सुरू होणार?
SHARES

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या 1 सप्टेंबर पासून नियमित सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रवासी विमान सेवेबाबत ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. चिपी विमानतळावरून विमान सेवा सुरळीत झाल्यास ऐन गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. 

चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काहीजण गोवा विमानतळावर उतरून पुन्हा कोकणात यावे लागत असे.  

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे याची भेट चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवे संदर्भात दिल्ली येथे भेट घेतली. त्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. 



हेही वाचा

Chandrayaan 3चे मुंबई कनेक्शन, 'या' कंपनीशी आहे खास संबंध

बेलापूरमध्ये पहिले बहुमजली पार्किंग लवकरच सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा