रिक्षानं प्रवास करण्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात अन्य शहरांमधील रिक्षाचालक मंगळवार ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ तत्काळ करावी, अवैध प्रवासी वाहतुकीबरोबरच ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवा बंद करावी या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडण्यात आला. परंतु, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचं रिक्षाचालक संघटनांचं म्हणणं आहे.
संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील अनेक रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. त्यामुळं दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. त्यामुळं आता सरकार रिक्षाचालकांच्या मागण्या पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
गोवंडी परिसरात इमारत कोसळली, ८ जण जखमी