Advertisement

विनावाहक बससेवेचा प्रवाशांसह वाहकांनाही मनस्ताप

मुंबईत ८६ मार्गावर ५४९ विनावाहक (no conductor) बससेवा (bus) सुरू आहे.

विनावाहक बससेवेचा प्रवाशांसह वाहकांनाही मनस्ताप
SHARES

खर्च कमी करण्यासाठी बेस्ट (best) उपक्रमाने मुंबईत पॉइंट टू पॉइंट (Point to point) विनावाहक (no conductor) बससेवा (bus) सुरू केली. मात्र, या बससेवेचा प्रवाशांसह वाहकांनाही मनस्ताप होत आहे, असा आरोप गुरूवारी भाजप सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला. या बससेवेबाबत तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले.  या सेवेतील त्रुटी दूर करण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने सदस्यांना या वेळी दिले.

मुंबईत ८६ मार्गावर ५४९ विनावाहक (no conductor) बससेवा (bus) सुरू आहे. विनावाहक बससेवेसाठी वाहकाला बसथांब्यावर बराच काळ उभे राहावे लागत आहे. या सेवेत मधल्या मार्गावर बसगाडय़ांना थांबा नाही. पहिल्या थांब्यावरून बस निघण्यापूर्वी वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर काही मोजक्याच बस थांब्यांवर बस थांबविण्यात येते. तेथे उपस्थित वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर बस थेट शेवटच्या थांब्यावर पोहोचते. विनावाहक सेवेमुळे वाहकांची तारांबळ उडत आहे. वाहक या बसगाड्यांसाठी एकाच ठिकाणी पाच ते सहा तास उभा राहतो. त्यामुळे प्रसाधनगृहातही जाता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे, असे सदस्यांनी निदर्शनास आणले.

विनावाहक  (no conductor) बसगाडय़ांच्या मागील दरवाजा बंद करण्यात येत असल्याच्या प्रकाराकडे भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी समिती सदस्यांचे लक्ष वेधले.  बसगाड्यांना एकच दरवाजा असणे, वाहक नसणे हे योग्य नसून प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विनावाहक बससेवा बंद करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.  विनावाहक बसगाड्यांमध्ये कमी प्रवासी असतात, तर काही गाड्यांमध्ये प्रवासीच नसतात. मात्र पॉइंट टू पॉइंट Point to point) सेवा देताना मधल्या थांब्यांवरून त्यांना नियमानुसार प्रवासी घेता येत नाहीत. परिणामी त्या थांब्यांवरील प्रवासी ताटकळत राहत असल्याने यात बेस्टचे नुकसान होत असल्याचे शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी सांगितले.


बेस्टमार्फत ८६ बस मार्गांवर विनावाहक 
 (no conductor) बससेवा (bus) सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ४१ मार्गांवर बेस्टच्या स्वमालकीच्या २२४ बस विनावाहक म्हणून धावतात. तर ४५ मार्गांवर भाडेतत्त्वावरील ३२५ बस धावत आहेत. विनावाहक बससेवेतील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील. या सेवा देताना प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिले.


  • मुंबईत ८६ मार्गावर ५४९ विनावाहक (no conductor) बससेवा (bus) सुरू आहे.
  • या बससेवेचा प्रवाशांसह वाहकांनाही मनस्ताप होत आहे, असा आरोप गुरूवारी भाजप सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला.



हेही वाचा - 

शीव उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद

कोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा

मोकाट कुत्र्याला सांभाळणं महिलेच्या बेतलं जीवावर; महिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा