Advertisement

लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू - राजेश टोपे

लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे.

लोकल सेवेच्या वेळेतील बदलासाठी पाठपुरावा करू - राजेश टोपे
SHARES

राज्य सरकारच्या परवानगीनंतर रेल्वे प्रशासनानं सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली. पंरतू, या लोकल प्रवासासाठी सामान्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळं लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे. यावर, लोकांचं हित आणि गरज पाहून सोयीच्या वेळापत्रकासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.

सर्वसामान्य प्रवाशांची सोय पाहूनच दळणवळणाबाबतचं निर्णय होणं अपेक्षित असतं. लोकांचं हित आणि गरज पाहून लोकल सेवेचं वेळापत्रक बदलण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार नक्कीच त्याचा विचार करेल. लोकांचं हित, गरज आणि सोय पाहूनच सामान्यपणे असे निर्णय  व्हायला हवेत. सध्याच्या वेळापत्रकात काही बदल करायचे असतील तर आरोग्य विभाग आणि राज्य सरकार निश्चित पाठपुरावा करेल, असं राजेश टोपे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

सर्वसामान्यांना पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी नियमित वेळेत पोहोचण्यासाठी किंवा तिथून परत घरी परतताना विनाकारण ताटकळत राहावं लागत असल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.



हेही वाचा -

मध्य व पश्चिम मार्गावर एका दिवसात १ लाख पासची विक्री

मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा