भायखळा - बाबुराव जगताप मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. इथे कचराकुंडी ठेवलेली असून मागील अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे आसपास कचरा पसरला आहे. हा करचा उचलण्याची पालिकेची गाडीही इथून फिरकलेली नाही. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काल गणपती विसर्जन करण्यात आले. त्यावेळी नागरिकांची तारांबळ उडाली.