वांद्र्याच्या रेक्लेमेशन परिसरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे कचऱ्याचा ढीग साचला आहे. या परिसरात 100 मीटरच्या अंतरावर कचारपेट्या ठेवल्या असून त्याच्या आसपास कचाराच कचरा पसरला आहे. मात्र इथे महापालिकेची गाडी येऊनही अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी आणि डास निर्माण झाल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.