Advertisement

सुशांतची आत्महत्या होती की हत्या? : कंगना राणावत

बॉलीवूडमधील नेपोटिझमनं सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनानं केली आहे.

सुशांतची आत्महत्या होती की हत्या? : कंगना राणावत
SHARES

बॉलिवूडमधील अनेक गोष्टी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर समोर येत आहेत. त्यातच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतनं (Kangna Ranuat) हिंदी सिनेसृष्टीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बॉलीवूडमध्ये स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं. तसंच बॉलीवूडमधील नेपोटिझमनं (Nepotism) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनानं केली आहे.

यासंदर्भातील एक व्हिडीओ कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कंगना म्हणाली, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनं सर्वांना हादरा बसला आहे. पण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं सिद्ध करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाची ज्या व्यक्तीनं स्कॉलरशीप घेतली आहे. जो इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, त्याचे मानसिक संतुलन कसं बिघडलेलं असू शकतं? त्याच्या गेल्या काही दिवसातील पोस्ट पाहिल्या, तर हे दिसून येतं की तो सर्वांना विनवणी करत आहे, की माझे देखील चित्रपट पाहा, माझा कोणी गॉडफादर नाही, मला या इंडस्ट्रीतून काढून टाकतील. हे त्यानं त्याच्या मुलाखतींमध्येही वारंवार सांगितलं आहे की, मला ही इंडस्ट्री स्वीकारत का नाही? मला एकटे पडल्यासारखं वाटतं… हा या दुर्घटनेचा पाया तर नाही ना? असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे.

त्याच्या ६-७ वर्षांच्या करिअरमध्ये ‘काय पो छे’ सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला कुठल्याही प्रकारची पोचपावती का मिळाली नाही? कुठला अवॉर्ड का नाही मिळाला?, केदारनाथ, एम. एस. धोनी किंवा छिछोरे सारख्या चित्रपटांना अवॉर्ड नाही, आणि गल्ली बॉयसारख्या टुकार चित्रपटाला अवॉर्ड मिळतो मग छिछोरेला का नाही? असा प्रश्न कंगनानं उपस्थित केलाय.

तुमचे आम्हाला काही नको, तुमचे चित्रपटपण नको, पण आम्ही जे करतो ते तुम्ही का नाही पाहात. ज्या चित्रपटांचं मी दिग्दर्शन केलं, त्या चित्रपटांना यांनी फ्लॉप ठरवलं, माझ्यावर ६ खटले का चालवण्यात आले, मला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न का केला गेला? हे प्रश्न देखील तिनं उपस्थित केले.

सुशांत सिंह राजपूतला काही पत्रकार मनोरुग्ण ठरवत आहेत. त्यांना संजय दत्तचं व्यसन तर क्युट वाटतं. मला हेच पत्रकार मेसेज करतात की, तुझा खूप वाईट काळ सुरू आहे, तू कुठला चुकीचा निर्णय नको घेऊ? असं ते का म्हणत आहेत? हेच मला कळत नाही. माझ्या डोक्यात हे का या गोष्टी भरु इच्छितात की मी आत्महत्या करायला हवी.




हेही वाचा

सुशांत तू का झालास शांत?

सुशांत सिंहची ५० स्वप्नांची ड्रीम लिस्ट, पण त्याआधीच...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा