इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डाचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला. त्यानंतर हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांचा चांगलाच संताप झाला आहे. या विरोधात सेलिब्रिटींनीही नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या फेरपरिक्षेबाबत अभिनेता फरहान अख्तरने खंत व्यक्त केली आहे. 'ज्यांची काहीच चूक नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार हे ऐकूनच प्रचंड राग येतोय. हे अत्यंत चुकीचे आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बळ येऊ दे' अशा आशयाचं ट्वीट फरहानने केलं आहे.
Feel terrible for all students who have to re-sit their exams for no fault of their own. So unfair and unfortunate. Wish them strength to get through this time. #CBSE #SSC
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) March 29, 2018
फरहानप्रमाणेच इमरान हाश्मीनेही या प्रकरणावर ट्वीटरवरून उपरोधिक भाष्य केलं आहे. इमरानने ट्वीटमध्ये CBSCचा उल्लेख Corrupt Board For Students Education असा केला आहे.
After the unfortunate paper leak, the acronym CBSE has a new meaning..... “Corrupt Board For Students' Education “ !!
— emraan hashmi (@emraanhashmi) March 28, 2018
तर अभिनेता विवेक ओबेरॉयने मुलांना या संधीचा फायदा घेत पुन्हा जोमाने अभ्यास करायचा सल्ला दिला आहे.
Jai Jinendra! This #MahavirJayanti let’s honour the beautiful spirit of #Jainism & apply its teachings of peace and harmony in our lives. This is my humble tribute to the amazing jain community... pic.twitter.com/ckR2agS8KK
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) March 29, 2018
सीबीएसईचा १० वी, १२ वीचा पेपर फुटला, पुन्हा होणार परीक्षा