केंद्र सरकारने शुक्रवारी बँकिंग क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १० बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. १० बँकांचं विलीनीकरण होऊन ४ मोठ्या बँका बनणार आहेत. या बँकांचा एकूण व्यवसाय ५५.८१ लाख कोटी रुपये असणार आहे. या निर्णयामुळे देशातील बँकांची संख्या आता १२ असेल.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, विलीनीकरण केल्यामुळे बँकांच्या कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचा ताळेबंद मजबूत होईल. बँकाना आंतरराष्ट्रीय आकाराचे बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी आम्ही कसोशीचे प्रयत्न करतो आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
बँकांच्या सुदृढीकरणासाठी सरकार त्यांच्यामध्ये हजारो कोटींचं भांडवल ओतणार असल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. यानुसार पीएनबीला १६ हजार कोटी रुपये, युनायटेड बँकेला १६०० कोटी रुपये, युको बँकेला २१०० कोटी रुपये, इंडियन ओवरसीज बँकेला ३८०० कोटी रुपये, इंडियन बँकेला २५०० कोटी रुपये, बँक आॅफ बडोदाला ७ हजार कोटी रुपये, युनियन बँकेला ११ हजार ७०० कोटी रुपये आणि कॅनरा बँकेला ६५०० कोटी रुपये मिळणार आहेत.
१) स्टेट बँक आॅफ इंडिया
२) पंजाब नेशनल बँक
३) बँक ऑफ बडोदा
४) कॅनरा बँक
५) युनियन बँक ऑफ इंडिया
६) बँक ऑफ इंडिया
७) अलाहाबाद बँक
८) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
९) इंडियन ओवरसीज बँक
१०) यूसीओ बँक
११) बँक ऑफ महाराष्ट्र
१२) पंजाब आणि सिंध बैंक