जर तुमचं स्टेट बँक आॅफ इंडिया (state bank of india-sbi) मध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं खातं आता बँकेकडून गोठवलं (freeze- फ्रीझ) जाऊ शकतं. एसबीआयने ग्राहकांना तसा अलर्ट (Alerts) च दिला आहे. ह्या अलर्टकडे खातेधारकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना चांगलंच महागात पडू शकतं.
एसबीआयने आपल्या खातेधारकांना केवायसी (KYC) अपडेट (update) करण्याचं आवाहन केलं आहे. जर खातेधारकांनी केवायसी अपडेट केलं नाही तर त्यांचं खातं गोठवलं जाऊ शकतं. एसबीआयने २८ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याची विनंती केली आहे. बँकांमध्ये Know Your Customer म्हणजेच KYC करणं हे अत्यंच महत्त्वाचं असतं. केवायसी अपडेट न केलेल्या ग्राहकांना एसबीआयने नोटीस पाठवली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नाहीत तर अशी खातं गोठवलं जातील असा इशारा एसबीआय (sbi) ने आपल्या ग्राहकांना दिला आहे.
केवायसी (KYC) अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे
ग्राहकांना सल्ला
एसबीआय (sbi) आपल्या ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बँक गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी माहिती देत आहे. एटीएम (ATM) कार्डाचे डिटेल्स आणि पिन (PIN) च्या माध्यमातून पैसे चोरण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे एसबीआयने ग्राहकांना एटीएम कार्ड आणि पिन क्रमांक सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा -