Advertisement

३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप

मेट्रो (metro) च्या कामाचा आता मुंबईकरांना आणि मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) चांगलाच मनस्ताप होत आहे. मुंबई (mumbai) त सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी तर होत आहेत. पण त्याबरोबर पाण्याच्या जलवाहिन्याही फुटत आहेत.

३ वर्षांत २५ जलवाहिन्या फुटल्या, मेट्रो कामाचा मुंबईकरांना मनस्ताप
SHARES

मेट्रो (metro) च्या कामाचा आता मुंबईकरांना आणि मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) चांगलाच मनस्ताप होत आहे. मुंबई (mumbai) त सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी तर होत आहेत. पण त्याबरोबर पाण्याच्या जलवाहिन्याही मोठ्या प्रमाणावर फुटत आहेत.  जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तर जलवाहिन्यांचंही मोठं नुकसान होत आहे. जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांनाही नाहक त्रास होणयासह मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

 कुलाबा ते दहिसर-ठाण्यापर्यंत मेट्रोची कामे सुरू आहेत. मागील ३ वर्षात मेट्रो (metro) साठी करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे २५ ते ३० जलवाहिन्या फुटल्या आहेत. मागील आठवड्यातत वेरावली येथे जलवाहिनी (water pipeline) फुटून हजारो लिटर पाणी (water)  वाया गेले. या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचा खर्च आता मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) मेट्रोकडून वसूल करणार आहे. जलवाहिन्या फुटत असल्याचा परिणाम मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. वेरावली येथे फुटलेल्या जलवाहिनीमुळे अंधेरी (andheri) पूर्व आणि पश्चिम तसेच घाटकोपर (ghatkopar) पश्चिम परिसरात चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला होता.  

जलवाहिन्या फुटल्यानंतर पालिका प्रशासनाने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना समज दिली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा नकाशा दिलेला आहे. त्याचा नीट अभ्यास करूनच खोदकाम करावे, अशी सूचना केलेली आहे. मात्र, याचा काहीच उपयोग झालेला नाही. २०१७ ते २०१९ या तीन वर्षात दक्षिण मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाजवळ, वांद्रे (bandra), गोरेगाव (goregav), मालाड (malad), कांदिवली (kandivali), बोरिवली (boriwali), दहिसर (dahisar), परळ (paral), वरळी (worli), दादर (dadar) यासह विविध परिसरांत जलवाहिन्या फुटल्या आहेत.

मेट्रो (metro) मुळे जलवाहिन्या (water pipeline) फोडल्यामुळे अनेक परिसरात पाणीपुरवठा बंद करावा लागतो. जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आल्यानंतरही पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) विभाग कार्यालयाला मेट्रोकडून कळवलं जात नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येते. जल अभियंता विभागाने मेट्रो प्राधिकरणाला जलवाहिन्यांच्या अलाइन्मेंटचे नकाशे दिले आहेत. 

मेट्रो (metro) साठी जमीन खोदताना पहिल्या तीन मीटरपर्यंत ट्रायल घेतली जाते. तिथपर्यंत जलवाहिनी  (water pipeline) लागली नाही तर मशीनने खोदकाम सुरू होते. मात्र अनेक जलवाहिन्या या तीन मीटरपेक्षाही खाली आहेत. मेट्रोने फोडलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी येणारा खर्च आणि जलवाहिनी फुटल्यामुळे वाया गेलेले पाणी यांचे मूल्यमापन करून तो खर्च मेट्रो प्राधिकरणाकडून वसूल केला जातो.  वेरावली येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्ती खर्चाचा आढावा घेऊन पालिका मेट्रोकडून वसूल करणार आहे. 


हेही वाचा -

आत्महत्या करण्याच्या ट्विटवर पोलिसांची समयसूचकता, तरूणाचे वाचवले प्राण

१० फेब्रुवारीपर्यंत 'आयडॉल'च्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ

मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी लाॅबींग सुरू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा