Advertisement

ग्रामीण भागातील रुग्णालयांना दिल्या जाणार ५०० रूग्णवाहिका – राजेश टोपे

यावर्षी ५०० नव्या रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ५८ लाख इतका खर्च अपेक्षित असून याला मान्यता देण्यात आलीये.

ग्रामीण भागातील रुग्णालयांना दिल्या जाणार ५०० रूग्णवाहिका – राजेश टोपे
SHARES

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना ने-आण करण्यासाठी वाहनांची कमतरता लक्षात घेता. लवकरच प्रत्येक ग्रामीण भागातील शासकिय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता ५०० नव्या रूग्णवाहिका देण्यात येणार आहेत. याठिकाणी वर्षानुवर्षे जुन्या रुग्णवाहिका कार्यरत होत्या. तर काही ठिकाणी रुग्णवाहिकाच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ग्रामीण भागात वर्षानुवर्ष जुन्या रूग्णवाहिका कार्यरत होत्या. या रूग्णवाहिका बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुन्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य न राहिल्याने काढून टाकण्यात आल्यायत. यावर्षी ५०० नव्या रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ५८ लाख इतका खर्च अपेक्षित असून याला मान्यता देण्यात आलीये. त्यामुळे आता महिन्याभरात ५०० रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत असले तरी मृत्यूदरावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६  हजार १२९  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण, दिवसभरात ६० जणांचा मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ नमुने पॉझिटिव्ह (१९.८७ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे. आज निदान झालेले ९२११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९८ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

हेही वाचाः- खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार

मुंबई मनपा-११०९ (६०), ठाणे- २३१ (१३), ठाणे मनपा-२८८ (१३),नवी मुंबई मनपा-३८० (६), कल्याण डोंबिवली मनपा-३०९ (१५),उल्हासनगर मनपा-८१ (७), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (७), मीरा भाईंदर मनपा-१११ (३), पालघर-७९ (१), वसई-विरार मनपा-२१५ (७), रायगड-३४७ (५), पनवेल मनपा-१५० (२), नाशिक-९९ (३), नाशिक मनपा-४१० (२), मालेगाव मनपा-१८, अहमदनगर-१३३, अहमदनगर मनपा-१७४, धुळे-९० (२), धुळे मनपा-५६ (३), जळगाव-१५४ (१०), जळगाव मनपा-३७ (२), नंदूरबार-११ (३), पुणे- २९४ (१०), पुणे मनपा-१४५८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-८३९ (१०), सोलापूर-२०४ (११), सोलापूर मनपा-४८ (४), सातारा-१४१ (७), कोल्हापूर-११२ (३), कोल्हापूर मनपा-४४ (१), सांगली-२९, सांगली मिरज कुपवाड मनपा-११०, सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५४, औरंगाबाद-१२९ (५), औरंगाबाद मनपा-४०९ (१२), जालना-१७ (४), हिंगोली-१० (१), परभणी-९, परभणी मनपा-२३ (२), लातूर-५२ (२), लातूर मनपा-१७, उस्मानाबाद-५१ (१), बीड-३८ (२), नांदेड-८९ (१), नांदेड मनपा-४ (२), अकोला-८ (३), अकोला मनपा-३ (१), अमरावती-२४, अमरावती मनपा-८० (३), यवतमाळ-२३, बुलढाणा-४० (२), वाशिम-२१ (१), नागपूर-९३ , नागपूर मनपा-१५३ (५), वर्धा-१३, भंडारा-६, गोंदिया-६, चंद्रपूर-१४, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-६, इतर राज्य ११ (१)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा