बोरीवली पश्चिमेकडील वीर सावरकर उद्यानात फिरण्यास गेलेल्या तीन जणांना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मधमाशांनी विषारी डंख मारला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.
मृत व्यक्तीचं नाव पंकज शाह (५२) असं असून रामनुज दड (३२) आणि मेरीस्ता रामोना रोंगाविला (४६) हे दोघेजण जखमी झाले आहेत.
लोकमान्य टिळक रोडनजीक असलेल्या वीर सावरकर उद्यानात एका झाडावर मधमाशीचं पोळं होतं. या पोळ्यातील मधमाशांनी उद्यानात फिरण्यास गेलेल्या तिघांचा चावा घेतला. मधमाशांच्या विषारी डंखाने तिघांना त्रास होऊ लागताच त्यांना जवळील करूणा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र मधमाशांचं विष शरीरात पसरल्याने उपचारादरम्यान पंकज शहा यांचा मृत्यू झाला. तर दड आणि रोंगाविला यांना उपचार करून सोडून दिल्याची माहिती करूणा रुग्णालयातील डाॅक्टर डाॅ. सावंत यांनी दिली.
हेही वाचा-
कांदिवलीत नववीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास परवानगी