Advertisement

मुंबई-अहमदाबाद हायवे वर भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर चिल्हार फाट्याजवळ अवाणढणी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद हायवे वर भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर चिल्हार फाट्याजवळ अवाणढणी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दांडी इथल्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य जखमी झाले असून त्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईकडून दांडी इथं परतताना प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

एकवीरा मातेचं दर्शन घेऊन हे कुटुंब पालघर तालुक्यातील बोईसर दांडी इथं परतत असताना हा अपघात घडला. वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती अतिगंभीर आहे तर सहा जण जखमी आहेत.

अपघातातील मृतामध्ये १) हेमंत तरे (वय -६०), २) सुषमा आरेकर (वय -३२), ३) चालक राकेश तमोरे (वय-४२), ४) सर्वज्ञा आरेकर (वय-०२) या चौघांचा समावेश आहे. तर, तृप्ती तामोरे (वय ३५), रमेश आरेकर (वय ५४) हे यांची प्रकृती गंभीर आहे.

याशिवाय, 1) हर्षद तरे (वय २७), 2) भव्या आरेकर (वय ४), 3) महेश आरेकर (वय ३९), 4)सुनील तामोरे (वय ४०) 5)आकाश पाटील (वय २५), 6) जयेश तामोरे वय (०३) हे सहाजण जखमी झाले आहेत.



हेही वाचा

ठाण्यातील तिसऱ्या कळवा पुलाचा पाटणीपर्यंत विस्तार

मुंबईतल्या 'या' ठिकाणी तयार होणार नवीन सायकलिंग ट्रॅक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा