आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मत देऊ नये, असं आवाहन चित्रपट आणि टिव्ही क्षेत्रातील कलाकारांनी केलं आहे. देशभरातील शेकडो कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते भाजपाविरोधात एकत्र आले आहेत.
चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि संबंधित मंडळी आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत एकत्र आले आहेत. भाजपाला मत देण्यासाठी आवाहन करणारं एक संयुक्त पत्रकदेखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन, दिग्दर्शक वेत्री मारन, दिग्दर्शक मिरांशा नाईक यांसारख्या शेकडो लोकांनी या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला निवडून देण्यात आलं होतं. परंतु या सरकारनं देशाला युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडलं. तसंच समाजात हिंदू-मुस्लीम तेढ वाढली असून मागासवर्गीय बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप या पत्रकातून करण्यात आला. तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे या सरकारनं दुर्लक्ष केल्याची टिकाही या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा -
शालिनी ठाकरेंकडून उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ शुभेच्छा
डोंगरीतून १३५ किलो सोनं जप्त, भंगारातून तस्करीचा डाव फसला