मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत, मात्र मागील काही वर्षांमध्ये उपनगरांत लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळानं ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २३६ प्रभागांचा सुधारित आराखडा तयार राज्य निवडणूक आयोगाकडे मागील आठवड्यात सादर करण्यात आला होता. या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे.
दरम्यान, यावर आता निवडणूक आयोगाने हरकती व सूचना मागविण्यास पालिका प्रशासनाला सुचित केले आहे. त्यानुसार यादी प्रसिद्ध करून प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.
२३६ प्रभागांचा सुधारित आराखडा तयार राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला होता. हा आराखडा मंजूर करीत राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना २३६ प्रभागांच्या सीमा आणि जनतेकडून हरकती व सूचना मागवण्याची सूचना केली आहे.