कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र सरकारने १७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. यामुळे लाॅकडाऊनच्या काळात केवळ महत्त्वाच्याच प्रकरणांवर मर्यादित वेळेत सुनावणी घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.
याआधीही उच्च न्यायालयाने लॉकडाऊनच्या काळात महत्त्वांच्या प्रकरणावर सुनावणी घेण्याबाबतचं परिपत्रक दोनदा काढले होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व प्रशासकीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील कनिष्ठ न्यायालये मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ महत्त्वाच्या याचिकांवरच सुनावणी घेतील. ही पद्धत १६ मेपर्यंत किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत सुरू ठेवावी, असंही परिपत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचा - चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे
सुनावणीदरम्यान वकील, पक्षकार, न्यायालयाचे कर्मचारी यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याची यादीही न्यायालयाने सादर केली आहे. त्यानुसार...
याशिवाय एप्रिल २०२१ पर्यंत जिल्हा न्यायपालिकेतील सर्वसाधारण बदल्या तहकूब करण्याचा निर्णयही उच्च न्यायालयाने घेतला आहे.