Advertisement

शाळा सुरू झाल्या नाही, तरी शिक्षण सुरूच राहणार- उद्धव ठाकरे

शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिले.

शाळा सुरू झाल्या नाही, तरी शिक्षण सुरूच राहणार- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोना विषाणू प्रादुर्भावा (coronavirus) नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर (education) मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक (new education year) वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसंच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिसीच्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता ,शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसंच शिक्षण विभागाचे संचालक आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

व्हर्च्युअल क्लासरूम

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असं नियोजन करणं आवश्यक आहे. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु शकली नाही तर ऑनलाईन-शिक्षण (online eduction), डिजिटल माध्यमाच्या (digital classrooms) पर्यांयाच विचार करावाच लागेल. विशेषतः कंटेन्मेंट झोन मधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोनमध्ये सुरु शाळा करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूमचे पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा - भूमिपुत्रांनो सज्ज व्हा! रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्री

डिजिटल क्लास

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ई-लर्निंग, डिजिटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांतील आराखडा तयार करण्यात यावा. दरवर्षी प्रमाणेच नियमित असं शैक्षणिक वर्ष सुरु होईल असं नियोजन करण्यात यावं. यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्यात यावी, अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

पाठ्यपुस्तके पीडीएफ

मुख्य सचिव मेहता यांनी कोविड-१९ चे नियमांचा पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होईल, असं गृहीत धरून नियोजन करण्याचे निर्देश दिले. राज्यात ७५० शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरु असल्याची माहिती कृष्णा यांनी दिली. 

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या तसंच प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली. सीईटीच्या परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत असल्याचं सांगितलं.

बालभारतीची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करण्यात आल्याने, ही पुस्तके ६७ लाख वेळा डाऊनलोड करण्यात आल्याची तसंच अन्य उपक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा