Advertisement

मोठी कामगिरी! महिला बचत गटांनी बनवले ९ लाख मास्क

लाॅकडाऊनच्या अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आतापर्यंत राज्यभरातील महिला बचत गटांनी तब्बल ९ लाख फेस मास्क बनवले आहेत.

मोठी कामगिरी! महिला बचत गटांनी बनवले ९ लाख मास्क
SHARES

लाॅकडाऊनच्या अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील महिला आर्थिक विकास महामंडळअंतर्गत (माविम) येणाऱ्या महिला बचत गटांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आतापर्यंत राज्यभरातील महिला बचत गटांनी तब्बल ९ लाख फेस मास्क बनवले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मास्कचा बाजारात असलेला तुटवडा पाहता माविमच्या २५ जिल्ह्यांतील सुमारे १०८ बचत गटातील महिला मास्क निर्मिती व वाटपाच्या उपक्रमात सहभागी झाल्या असून शासकीय तसेच खासगी कंपन्यांकडून आलेल्या मागणीनुसार सुमारे ९ लाख ३१ हजार मास्क तयार करून वितरित करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना सहज वाजवी दरात मास्क उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा- १५ दिवसांत मिळणार अंगणवाडी बालकांना घरपोच शिधा

शिवभोजनाची व्यवस्था

राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये गोरगरिबांसाठी मोठा आधार ठरली आहे. या योजनेतही राज्यातील १२ जिल्ह्यात माविमचे २२ महिला बचत गट योगदान देत असून आतापर्यंत भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, नाशिक, नंदुरबार, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ५६,९०६ लाभार्थ्यांनी शिवभोजन उपक्रमाचा लाभ घेतला आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर, ऊसतोड कामगार, माथाडी कामगार यांच्याकरिता जेवणाची सोय करण्याकरिता माविम बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. १३ जिल्ह्यातील २५ 'कम्युनिटी मॅनेज्ड रिसोर्स सेंटर'मार्फत (सीएमआरसी) सुमारे १५ हजार लोकांना जेवण पुरविलं जात आहे.

भाजीपाला पुरवठा 

३२ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा साडेबारा हजार टन भाजीपाल्याचं वितरण हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबांचे उत्पन्नाचे साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवत आहे. २३ जिल्ह्यांतील १२२ गटांमार्फत ३२,४१० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. वाहतुकीची साधने बंद झाल्यामुळे भाजीपाल्याची वाहतूकही बंद झाली. या अडचणी लक्षात घेता माविमच्या ६ सीएमआरसीमार्फत १२ हजार ३०० टनचा भाजीपाला मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात वितरित करण्यात आला. असे अनेक उपक्रम माविममार्फत राबविण्यात येत आहेत. 

हेही वाचा- प्राॅपर्टी व्यवहारांच्या नोंदणीला परवानगी

याव्यतिरिक्त अमृत आहार योजनेंतर्गत दिला जाणारा चौरस आहार, अंगणवाडी सेविकांचं मानधन त्यांच्या खात्यात जमा करणे, नागरी भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांनी प्रोत्साहनपर भत्ता विमा मिळणे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्कीम अंगणवाडी सेविका-मदतनीसांनाही लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करणे इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा