Advertisement

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर साथीचा प्रसार नको– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात लॉकडाऊनची (lockdown) स्थिती १७ तारखेनंतर कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसंच अपेक्षा याचं नियोजन करून ते कळवावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर साथीचा प्रसार नको– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
SHARES

राज्यात लॉकडाऊनची (lockdown) स्थिती १७ तारखेनंतर कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसंच अपेक्षा याचं नियोजन करून ते कळवावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितलं. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना (coronavirus) संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल, यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील हे पाहावं, कुठल्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनच्या बाहेर साथीचा प्रसार होता कामा नये, असे निर्देशही त्यांनी दिले. 

जिल्ह्याच्या सीमा सील

मुख्यमंत्री म्हणाले, पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत. आता मोठ्या प्रमाणावर मजुरांची ये-जा सुरु झाली आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही.

कडक बंधने

कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोन्समध्ये (contentment zone) कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिलं पाहिजे. या झोनबाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - उद्धव ठाकरे निघाले नोकरदार, संपत्तीचा आकडा बघून चकीत व्हाल!

कोरोनाग्रस्त वाढतील 

आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावं लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसंच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

आर्थिक आणीबाणी

एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत. मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथं अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्स मध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे .पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या. राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे मात्र आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत. या एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत, त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

रिक्त जागाही भराव्या

पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या  कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याच्या रिक्त जागाही भराव्या लागतील.

गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढं आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करून काही लक्षणे आहेत का ते तपासलं. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे, तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

स्थानिकांना रोजगार

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा,  एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांमधून उपलब्ध करून द्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा