Advertisement

मुंबईत कोरोनाचे १४३२ नवे रुग्ण, ३१ जणांचा दिवसभरात मृत्यू

शनिवारी दिवसभरात ६८२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १५ हजार ५०० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १४३२ नवे रुग्ण, ३१ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी कोरोने ३२८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १४३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३१ रुग्ण दगावले आहेत. तर २८ आॅगस्ट रोजी ३० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २७ आॅगस्ट रोजी एकूण ३० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १४३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ४३ हजार ३८९ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ६८२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख १५ हजार ५०० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- दारूची दुकानं उघडायला जेवढा उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडायला दाखवा- देवेंद्र फडणवीस

राज्यात आज ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५  हजार १३१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख १० हजार २०० नमुन्यांपैकी ७ लाख ६४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०५ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख १२ हजार ०५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १६,८६७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), ठाणे मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९), पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), पुणे मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४), सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६), नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा