Advertisement

मुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू

बुधवारी दिवसभरात २०६६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ६९ हजार २६८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात बुधवारी कोरोनाने ४३० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात २६५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ रुग्ण दगावले आहेत. तर २९ सप्टेंबर रोजी ४९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २८ सप्टेंबर रोजी एकूण ४० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २६५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ३ हजार १४२ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात २०६६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ६९ हजार २६८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-प्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना

राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नविन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १४,९७६ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२६५४ (४६), ठाणे- ३२० (८), ठाणे मनपा-४७३ (३६), नवी  मुंबई मनपा-४५२ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५२७ (११), उल्हासनगर मनपा-४० (१), भिवंडी निजामपूर मनपा-३१ (४), मीरा भाईंदर मनपा-२३९ (९), पालघर-१७१ (१२), वसई-विरार मनपा-२४२ (३०), रायगड-३३६ (७), पनवेल मनपा-२५८ (१), नाशिक-४६५ (६), नाशिक मनपा-८९३ (१५), मालेगाव मनपा-३३ (१), अहमदनगर-६३९ (७), अहमदनगर मनपा-१२५ (५), धुळे-६१, धुळे मनपा-६६, जळगाव-२५३ (१), जळगाव मनपा-१०६, नंदूरबार-४० (१), पुणे- ११७९ (२१), पुणे मनपा-१३७० (२८), पिंपरी चिंचवड मनपा-७१२ (३१), सोलापूर-३६८ (५), सोलापूर मनपा-६४, सातारा-६०१ (२९), कोल्हापूर-३३९ (१५), कोल्हापूर मनपा-९१ (५), सांगली-४११ (१८), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१४९ (५), सिंधुदूर्ग-५४ (२), रत्नागिरी-११७ (१३), औरंगाबाद-१२७ (७),औरंगाबाद मनपा-१९६ (१), जालना-१३४, हिंगोली-२८, परभणी-६२ (७), परभणी मनपा-२६ (१), लातूर-११६ (७), लातूर मनपा-९३ (१), उस्मानाबाद-२५६ (११), बीड-२१४ (३), नांदेड-१३६ (७), नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२२ (५), अकोला मनपा-५२ (३), अमरावती-८३ (१), अमरावती मनपा-९७, यवतमाळ-१६२ (३), बुलढाणा-२४३ (९), वाशिम-१५० (९), नागपूर-३१३ (९), नागपूर मनपा-१०३८ (१४), वर्धा-१२७, भंडारा-१५५ (१), गोंदिया-१७७ (२), चंद्रपूर-२२५ (१), चंद्रपूर मनपा-१४३, गडचिरोली-६९, इतर राज्य-२३ (१).

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा