Advertisement

मुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात १२३६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९३ हजार ८९७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ८६२ नवे रुग्ण,४५ जणांचा दिवशभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी कोरोने ३०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ८६२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-‘या’ गुन्ह्यात रॅपर बादशाहची पोलिसांनी केली ४ तास चौकशी

 राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५ रुग्ण दगावले आहेत. तर ६ आँगस्ट रोजी ५७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ आँगस्ट रोजी एकूण ४२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे ८६२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २१ हजार २७ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात १२३६ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९३ हजार ८९७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-Mumbai Rains: ११ आॅगस्टनंतर वाढणार पावसाचा जोर! स्कायमेटचा अंदाज

राज्यात आज नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आज देखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५  हजार ५८२  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २५ लाख ६९ हजार ६४५ नमुन्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.०७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८२ हजार ७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार २६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४९ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १०,४८३ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-८६२ (४५), ठाणे- १७५ (५), ठाणे मनपा-१८८ (१०),नवी मुंबई मनपा-३८५ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२५२ (६),उल्हासनगर मनपा-२० (२), भिवंडी निजामपूर मनपा-९ (४), मीरा भाईंदर मनपा-७३ (३),पालघर-६७, वसई-विरार मनपा-१३५ (१४), रायगड-२५६ (९), पनवेल मनपा-१७५ (१९), नाशिक-२११(२),नाशिक मनपा-५२७ (२३), मालेगाव मनपा-४३(१),अहमदनगर-२८१ (४),अहमदनगर मनपा-१८५ (१), धुळे-८ (२), धुळे मनपा-११६ (१), जळगाव-४१७ (५), जळगाव मनपा-४ (१), नंदूरबार-१३, पुणे- ५५१ (१७), पुणे मनपा-१३९५ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१८), सोलापूर-२५२ (५), सोलापूर मनपा-५१ (२), सातारा-२२० (६), कोल्हापूर-१७८ (६), कोल्हापूर मनपा-९२, सांगली-७१ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१२१ (२), सिंधुदूर्ग-१५, रत्नागिरी-१३ (३), औरंगाबाद-२५१ (२), औरंगाबाद मनपा-१९६ (२), जालना-६१, हिंगोली-६०, परभणी-२८, परभणी मनपा-३४, लातूर-१३० (२), लातूर मनपा-४२ (३), उस्मानाबाद-१६३ (१), बीड-१४२ (२), नांदेड-१२८ (५), नांदेड मनपा-७० (१),अकोला-४४, अकोला मनपा-२७ (१), अमरावती-३२ (१), अमरावती मनपा-५१ (४), यवतमाळ-३४, बुलढाणा-४४ (३), वाशिम-५९ (१), नागपूर-१७१ (४), नागपूर मनपा-३४६ (११), वर्धा-३, भंडारा- १३, गोंदिया-८, चंद्रपूर-३७, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-२१, इतर राज्य १३(१).

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा