Advertisement

सततच्या पावसामुळं भाजीपाला महागला

मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाल्यांवर बसत आहे. सततच्या पावसामुळं भाजा्यांची आवक घटली आहे.

सततच्या पावसामुळं भाजीपाला महागला
SHARES

मागील काही दिवस मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार बॅटींग केली. या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाल्यांवर बसत आहे. सततच्या पावसामुळं भाजा्यांची आवक घटली असून भाज्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईत कांदा, भेंडी, कोथिंबिर यांसारख्या भाज्या ६० रुपये किलोच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळं मुंबईकरांना नियमित भाजीपाला विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.

भाजीपाल्याची आवक 

मुंबईला भाज्यांचा सर्वाधिक पुरवठा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होतो. तसंच, बाजार समितीत प्रामुख्यानं नाशिकनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होतीपण यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहेत्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत.

भाजीपाल्यांचे घाऊक दर


मुंबईत वाशी येथून भाजी आणण्याचा सरासरी खर्च प्रतिकिलोमागं ६ ते ८ रुपये असतो. त्यामुळं भाज्यांचे घाऊक दर दररोज ६ ते ८ रुपये वधारल्यास किरकोळ बाजारात ही वाढ १२ ते १४ रुपये इतकी होते. त्यामुळं पावसाचा जोर कायम राहिला तर, सर्वच भाज्या किरकोळ बाजारात १०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे.


भाज्यांचे दर(प्रतिकिलो)

भाजी 
जुने दर
सध्याचे दर
भेंडी
४०         
६०
फ्लॉवर
८०      
१००
बटाटा
२२        
 २८
कांदा
४०६०
कोथिंबिर
४०६०
हिरव्या मिरच्या६०८०
कोबी४०५०
ढोबळी मिरची४०६०


हेही वाचा -

मुंबई-ठाण्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा

अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा