महाराष्ट्रात (maharashtra) यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी धडकला आहे. यातच मुंबईसह लगतच्या शहरांत रविवारपासून पावसाची कोसळधार सुरु होती. मंगळवारी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई शहरासह उपनगरात तसेच ठाणे (thane), नवी मुंबईत (navi mumbai) पाऊस सुरु आहे. मंगळवारच्या ब्रेकनंतर पाऊस बरसत असल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.
मुंबईतील दादर परिसरात वारा सुटला आहे. यातच मुसळधार पाऊस देखील सुरु झालाय. त्यामुळे बाजार परिसर तसेच रहिवाशांना पुन्हा अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
पावसाची संततधार सुरु राहिल्यास त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकाला बसण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत आहेत.
ठाण्यातही पावसाचे ढग दाटले असून जोरदार पाऊस सुरु आहे. ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. संभावित धोका टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने सखल भागात पाणी साचू नये म्हणून सक्शन पंप लावण्यात आले आहेत. मात्र साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात दुपारनंतर पाऊस (heavy rain) सुरू झाला. जोरदार पावसामुळे परिणामी अंधेरी सबवे नेहमीप्रमाणेच पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अंधेरीसह कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव या विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. पण कोठेही पाणी साचलेले नाही.
पावसामुळे मुंबईतील मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकातील गळतीचे चित्र समोर आल्यानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही तीच स्थिती उद्भवली आहे. वरळी मेट्रो स्थानकातील तिकीट काउंटरजवळ पाणीगळती सुरू झाली आहे.
गळती रोखण्यासाठी खाली बादली ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. बादली भरल्या नंतर कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर फेकले जात आहे.
हेही वाचा