केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना दिवाळीच्या आधीच मोठी भेट दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्तावाढीला मंजुरी दिली आहे.
DA for government employees increased by 5 %.
— PIB India (@PIB_India) October 9, 2019
Around 50 lakh central government employees and 62 lakh pensioners to be benefited: Union Minister @PrakashJavdekar pic.twitter.com/W8BdKkdpGw
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता १७ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी महागाई भत्ता १२ टक्के होता. वाढीव भत्ता १ जुलै २०१९ पासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाख कर्मचारी आणि ६२ लाख निवृत्त वेतनधारकांना फायदा होणार आहे. सहसा महागाई भत्त्यात २ ते ३ वाढ होते. मात्र, यावेळी सरकारने ५ टक्के वाढ केली आहे.
महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अधिक बोजा पडणार आहे. आशा स्वयंसेविकांचा पगार १ हजार रुपयांवरून २ हजार रुपया केला असल्याचंही प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम किसान योजना आधारला लिकं करण्याची मुदत ३१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा -
SBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले
बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?