कांदिवलीतल्या चारकोप इथं असलेल्या श्री साई सच्चिदानंद मंदिरात रविवारी सकाळी ३.३० च्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की मंदिराच्या आत झोपलेल्या पुजार्यांना बाहेर येण्याची संधीही मिळू शकली नाही. या घटनेत दोन पुजारींना घटानास्थळीच आपला जीव गमवावा लागला. तर आणखी एका पुजारीची प्रकृती चिंताजनक होती. पण उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप इथल्या श्री साई सच्चिदानंद मंदिरात अचानक आग लागली. घटनेच्या वेळी मंदिरातील संस्थापक युवराज पवार, सुभाष खोडे आणि मोनू गुप्ता मंदिरात झोपले होते. या लोकांना आगीची कल्पना येताच तिघांनी उठून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण मंदिराला कुलूप लागल्यानं तिघंही मंदिरात अडकले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तीन पुजारी टाळा उघडू शकले नाहीत. बाहेर येऊ न शकल्यानं त्यांना जीव गमवावा लागला. यात युवराज पवार आणि सुभाष खोडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनू गुप्ता यांना प्रकृती चिंताजनक असून शताब्दी रुग्णालयात मुंबईत दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा