Advertisement

महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच

मुख्य सचिव आणि संबंधित पक्षांसोबत एक बैठक आयोजित केली जाण्याची अपेक्षा आहे ज्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जाईल.

महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्र सरकार लवकरच निर्बंध शिथिल करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या अलीकडेच येत आहेत. पुढील काही दिवसांत त्याबाबतचा आदेश दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सांगितलं की, केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनंतर, संभाव्य निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अधिकाऱ्यानं अहवालाद्वारे उद्धृत केलं की, मुख्य सचिव आणि संबंधित पक्षांसोबत एक बैठक आयोजित केली जाण्याची अपेक्षा आहे. ज्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाईल.

या आठवड्याच्या सुरुवातीला, केंद्र सरकारनं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त COVID-19 निर्बंध शिथिल किंवा त्यात बदल करण्यास सांगितलं आहे. कारण कोरोना रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस घसरण पाहायला मिळत आहे.

याव्यतिरिक्त, मुंबईनं सलग तिसर्‍या दिवशी शून्य मृत्यूची नोंद केली आहे. ज्यामुळे गुरुवार, १७ फेब्रुवारी रोजी एकूण मृत्यूची संख्या १६,६८५ वर कायम आहे.

त्याच दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये २५९ नवीन कोविड-१९ प्रकरणं नोंदवली गेली.

शिवाय, महाराष्ट्रात कोविड-१९च्या ओमिक्रॉन प्रकाराचे एकही नवीन प्रकरण आढळलं नाही. त्याच दिवशी, महाराष्ट्रात २,७९७ रुग्ण आढळले.



हेही वाचा

ठाण्यातील 'या' भागात बर्ड फ्लू, ३०० कोंबड्यांचा मृत्यू

कांदिवलीतील 'या' कॉलेजनं कॅम्पसमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा