केळवे चौपाटी इथं फिरायला गेलेल्या ४ जणांचा जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील केळवे चौपाटीवर ५ पर्यटक फिरण्यासाठी आले होते. ४ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून एकाला बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, बेपत्ता असलेल्या २ जणांना शोधण्यासाठी स्थानिक पर्यटक व्यवसायिक व मच्छिमार समाजातील मंडळी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.
नेमकं काय घडलं?
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे येथील स्थानिक वास्तव्य करत असलेली २ लहान मुले समुद्रात पोहायला उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्यानं ही मुलं बुडत आहेत, असं लक्षात येताच नाशिक येथील ब्रम्हा व्हॅली स्कूलचा एक मोठा ग्रुप केळवे येथे पर्यटन स्थळसाठी मौजमजा करण्यासाठी आला होता. या सर्वांना ही लहान मुलं बोलवत आहेत असे लक्षात आल्यानं यापैकी चौघांनी समुद्रात उड्या मारल्या व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यामध्ये केळवे येथील स्थानिक रहिवासी असलेली दोन्ही मुलं व त्यांना वाचवण्यासाठी गेलेले चौघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरूप असून बुडाल्यापैकी २ जण बेपत्ता असलेल्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
बुडून मृत्यू झालेल्याची नावं
अभिलेख देवरे (१७) राहणारा नाशिक, ब्रह्मा व्हॅली या पर्यटकाला बुडताना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक मुळचे नाशिक जिल्ह्यातील आहे.
यासाठी स्थानिक व्यवसायिक आणि स्थानिक मच्छिमार मंडळी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे, घटनास्थळी पोलिसांची फौज पोहोचले असून शोधकार्य सुरू आहे.