गेल्या ४ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली. पावसाच्या तुफान बॅटींगमुळं मुंबईचे रस्ते जलमय झाले असून, अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. यामुळं अनेकांचं जगणं कठीण झालं होतं. सर्वत्र घरभर पाणी साचलं होतं. शिवाय, याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. याच कारण म्हणजे पाणी साचल्यानं अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होता.
मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वीजपुरवठा खंडीत झाला. परिणामी मुंबईकरांना काही काळ हा अंधारात काढावा लागला. मात्र, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बेस्टच्या विद्यूत पुरवठा विभागानं तातडीनं संबंधित परिसरातील वीजपुरवठा सुरू केला.
today even d water supply has taken "Sunday Off" leaving mumbai thirsty for a day. no alternate.
— subhash ghogale (@kajirmala) July 18, 2021
Heavy flooding with power cut in Mumbai! Very bad situation😭
— Sanyogita Singh (@SinghS1007) July 17, 2021
Power cut for 2-3 hours in night.
— Saurabh singh (@saurabhs0607) July 18, 2021
Doob gyi thi Mumbai
18-07-2021
— Abbas Raza (@AbbasR9619988) July 18, 2021
No water supply in Dharavi mumbai 400017
This is done without any notice, there is a panic in locals because water is needed let us know when we will get the supply of water @mybmcWardGN @mybmc @VarshaEGaikwad @gallinews @DighavkarKiran pic.twitter.com/KYECzEzUAS
दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होते. याच कारण म्हणजे पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचं काम केलं जातं. शिवाय, भूमीगत कामं ही मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळं याचा फटका हा विद्यूत पुरवठ्यावर होते. त्यामुळं पावसाळ्यात पाणी साचल्यास संबंधित परिसरातील वीजपुरवठा हा खंडित होतो.