पुढच्या काही दिवसांत मुंबई पोलीस (Mumbai police) वाहनांऐवजी घोड्यावरून गस्त घालताना दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, यामागचं कारण म्हणजे मुंबई पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अश्वदल (mounted police unit) सुरू करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. शिवाजी पार्क इथं २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात हे अश्वपथक सहभागी होणार असून त्यानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यातही हे दल कार्यरत राहील.
या संदर्भात माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) म्हणाले की, मुंबई महानगरात वाहनांची संख्या वाढल्यानंतर अश्वदलाला पोलीस विभागातून हटवण्यात आलं होतं. सद्यस्थितीत मुंबई पोलीस दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या माध्यमातून कायदा- सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. पण पोलीस घोडेस्वार असल्यास त्यांना उंचीवरून जमावावर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे. तसंच वाहतुकीची कोंडी फोडणे आणि समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालण्यासाठीही अश्वदल उपयुक्त ठरू शकेल.
हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?
अश्वदल पथक १९३२ साली बंद करण्यात आले होते, अश्वदल पोलीस युनिट च्या अंतर्गत पुन्हा एकदा 88 वर्षानंतर २६ जानेवारी २०२० रोजी ३० अश्वांचे, अश्वपथक मुंबईत सुरू करण्यात येत आहे या अश्वदल ट्रेनिंग युनिटची आज पाहणी केली... pic.twitter.com/K9wCi1PZNL
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 19, 2020
अश्वदलासाठी मुंबई पोलिसांनी १३ घोडे खरेदी केले असून पुढील ६ महिन्यांत आणखी घोडे खरेदी करण्यात येणार आहेत. या घोड्यांची व्यवस्था सद्यस्थितीत शिवाजी पार्क (shivaji park) इथं करण्यात आली आहे. परंतु लवकरच त्यांच्यासाठी मरोळ इथं २.५ एकर जागेवर पागा तयार करण्यात येईल, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
अश्वलदाची वैशिष्ट्ये:
Hon'ble Home Minister, Maharashtra, Shri Anil Deshmukh, inaugurated the new "Mounted Police Unit" today in the presence of CP Mumbai, Shri Sanjay Barve & other senior officers today at Shivaji Park.@cmomaharashtra@DGPMaharashtra@pmoindia@Dev_Fadnavis pic.twitter.com/H7LUnFehWz
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 19, 2020
ब्रिटीश काळातील मुंबई पोलीस दलात अश्वदल कार्यरत होतं. परंतु १९३२ साली अश्वदल बंद करण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने (british india) घेतला होता. मुंबईत वाढत असलेली वाहनांची गर्दी त्याला कारणीभूत होती. त्यानंतर तब्बल ८८ वर्षांनी हे दल पुन्हा कार्यरत होणार आहे. यामुळे मुंबई पोलीस दलाच्या वैशिष्ट्यांमध्ये आणखी भर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा- मुंबईत नशेसाठी कप सीरप घेणाऱ्यांमध्ये वाढ