Advertisement

लक्ष द्या! ठाण्यातील 'या' भागात 18-19 एप्रिलला पाणीपुरवठा बंद

एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे

लक्ष द्या! ठाण्यातील 'या' भागात 18-19 एप्रिलला पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे (काही भाग) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत काटई नाका ते शीळ टाकी या बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने गुरुवार 18 एप्रिल दुपारी 12.00 ते शुक्रवार, 19 एप्रिलपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समिती आणि रूपादेवी पाडा, किसन नगर नं. मधील सर्व भागात 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. नेहरू नगर व मानपाडा प्रभाग समिती रूपादेवी पाडा, किसन नगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समिती या भागातील पाणीपुरवठावर परिणाम होईल.

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. सदर कपात कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.



हेही वाचा

ठाणे : कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

मुंबईकरांनो लक्ष द्या! वांद्रे-धारावीसह 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा