आॅक्टोबर महिना सुरू होताच मुंबईकरांना 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा बसू लागला अाहे. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत सरासरी ३३ अंश तापमान आहे. त्यामुळे कडक ऊन आणि घामाने मुंबईकर बेहाल झाले आहेत.
या वर्षी मुंबईत समाधानकारक पाऊस झला. मात्र पाऊस माघारी परतल्याक्षणी तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळेच मुंबईकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. कामानिमित्त भटकंती करणाऱ्या मुंबईकरांची पावले तहान शमवण्यासाठी ज्युस सेंटरकडे वळत आहेत.
या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर आजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उन्हामुळे चक्कर येणे, मळमळणे, थकवा येणे, अंगदुखी, डोकेदुखी असे आजार होऊ शकतात.
पुढील २४ तास हवामान ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तवली केली आहे. तर मुबंई उपनगरात ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)