जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 6 महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मोठं अर्थसहाय्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील 6 जणांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, 'या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहोत. जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
हेही वाचा