सोमवारी स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली होती. या निवडणुकीतूनही काँग्रेसनं ऐनवेळी माघार घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारीही झाली. त्यामुळे शिवसेनेला शह देण्याची तयारी करणाऱ्या भाजपला तिन्ही समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला.
काँग्रेसच्या या माघारीच्या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेसमोर लोटांगण घातले, अशी टीका भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी
रिक्षांच्या वयोमर्यादेत बदल, १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या रिक्षांवर बंदी
मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातात वाढ