मुंबई-अहमदाबाद मार्गे गुजरातमधून २५ टँकरच्या माध्यमातून दूध मुंबईत आणण्यात येत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे २५ टँकर अच्छाड इथं अडवले.
दूधकोंडी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकच दिसत असून हे आंदोलन थेट गुजरातच्या सीमेवर जाऊन धडकलं आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गे गुजरातमधून २५ टँकरच्या माध्यमातून दूध मुंबईत आणण्यात येत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे २५ टँकर अच्छाड इथं अडवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी स्वत: रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.
नेमकं काय झालं?
सकाळी गुजरातवरून मुंबई-अहमदाबाद मार्गाने मुंबईत दुधाचे २५ टँकर म्हणजेच अंदाजे ३ लाख ७५ हजार लीटर दूध आणण्यात येत असल्याची माहिती शेट्टी यांनी मिळाली. त्यानंतर स्वत: शेट्टी कार्यकर्त्यांसह मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अच्छाड परिसरात पोहोचले आणि तिथं त्यांनी दुधाचे २५ टँकर अडवले. दूधकोंडी अशीच सुरू राहिली तर मुंबईत दूधटंचाई होण्याची दाट शक्यता आहे.
सीमेवर पोलिस बंदोबस्त
या दूधकोंडी आंदोलनामुळे अच्छाड इथं ताणावाचं वातावरण पसरलं असून गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
दूधकोंडीचा अटोकाट प्रयत्न
दूधकोंडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी मुंबईला दुधाचा एकही थेंब येऊ देणार नाही असं म्हणत सर्व महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा दिला होता. सरकारनं गुजरात आणि कर्नाटकमधून दूध आणण्याचा प्रयत्न केला तर तोही आणून पाडू असं शेट्टीनी म्हटलं होतं. त्यानुसार पहिल्या दिवसापासून आंदोलक मुंबईबाहेरून दूध येणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहेत.
दूधकोंडी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकच दिसत असून हे आंदोलन थेट गुजरातच्या सीमेवर जाऊन धडकलं आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गे गुजरातमधून २५ टँकरच्या माध्यमातून दूध मुंबईत आणण्यात येत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे २५ टँकर अच्छाड इथं अडवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी स्वत: रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.
नेमकं काय झालं?
सकाळी गुजरातवरून मुंबई-अहमदाबाद मार्गाने मुंबईत दुधाचे २५ टँकर म्हणजेच अंदाजे ३ लाख ७५ हजार लीटर दूध आणण्यात येत असल्याची माहिती शेट्टी यांनी मिळाली. त्यानंतर स्वत: शेट्टी कार्यकर्त्यांसह मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अच्छाड परिसरात पोहोचले आणि तिथं त्यांनी दुधाचे २५ टँकर अडवले. दूधकोंडी अशीच सुरू राहिली तर मुंबईत दूधटंचाई होण्याची दाट शक्यता आहे.
सीमेवर पोलिस बंदोबस्त
या दूधकोंडी आंदोलनामुळे अच्छाड इथं ताणावाचं वातावरण पसरलं असून गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
दूधकोंडीचा अटोकाट प्रयत्न
दूधकोंडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी मुंबईला दुधाचा एकही थेंब येऊ देणार नाही असं म्हणत सर्व महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा दिला होता. सरकारनं गुजरात आणि कर्नाटकमधून दूध आणण्याचा प्रयत्न केला तर तोही आणून पाडू असं शेट्टीनी म्हटलं होतं. त्यानुसार पहिल्या दिवसापासून आंदोलक मुंबईबाहेरून दूध येणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहेत.