Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
SHARES

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण कडक उन पडत असलं तरी मुंबईकरांना जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे. तलाव क्षेत्रात पुरेसा जलसाठा असल्याने यंदा नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा साठा आहे. मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा ७ धरणांमधून हा पाणीपुरवठा होत असतो. मात्र २०१८ मध्ये पाऊस कमी झाल्यानं गत वर्षी मुंबईकरांना काही काळ पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु, गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळं तलावांमध्ये मुबलक जलसाठा जमा झाला.

सध्या तलाव क्षेत्रात एकूण ३ लाख ९० हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गतवर्षी मे महिन्यात जेमतेम १५ ते १८ टक्के जलसाठा तलावांमध्ये होता. मात्र यावर्षी आणखी ३ महिने म्हणजे जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्यानं यावर्षी पाणीकपात करण्याची वेळ पालिकेवर येणार नाही. त्यामुळं कोरोनारूपी संकटामुळं सध्या बेजार झालेल्या मुंबईकरांना यंदा पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.

मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यापैकी सुमारे ९०० दशलक्ष लीटर चोरी तसेच गळतीमुळे वाया जाते. वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणी असणे आवश्यक असते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा