एका मागोमाग विक्रम रचणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरोट कोहली नेहमीच चर्चेत असतो. अाताही तो चर्चेत अाला अाहे. पण कोणता विक्रम करून नाही तर एक नवा वाद ओढवून. अापला खेळ न अावडणाऱ्या एका चाहत्याला विराटने चक्क देश सोडून जाण्याचा सल्ला दिला अाहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला अाहे. विराटला टीका सहन होत नाही का? अशी चर्चा अाता क्रिकेट जगतात होत अाहे.
नुकतेच 'विराट कोहली ऑफिशियल अॅप'चं प्रमोशन झालं. या प्रमोशनल व्हिडिओत विराटने एका चाहत्याला भारत सोडून जा असं म्हटलं अाहे. विराटच्या फलंदाजीत विशेष असं काही नाही. मला परदेशातील खेळाडूंची फलंदाजी अावडते. विराट कोहलीचं खूपच स्तोम माजवण्यात येत आहे, अशी पोस्ट एका चाहत्याने टाकली अाहे. या पोस्टमुळे विराट चिडला. इथे रहायचं अाणि परदेशी खेळाडूंचं कौतुक करायचं हे योग्य नाही. तुम्ही भारतातून चालते व्हा आणि इतर देशात राहा, असा सल्ला त्याने दिला.
विराटच्या या सल्ल्यानंतर सोशल मिडीयावर त्याच्यावर टिकेचा भडीमार सुरू अाहे. विराटला हर्षल गिब्जसारखे परदेशी खेळाडू आवडतात. त्याने लग्नही परदेशात केलं, याचा त्याला विसर पडला आहे का, अशी टिका त्याच्यावर सुरू अाहे.
हेही वाचा -
रोहितने मोडला विराटचा विक्रम; टी २० मध्ये बनवल्या सर्वाधिक धावा
जहीर मुंबई इंडियनचा बाॅलिंग कोच?