महाराष्ट्र बॅक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लिन चीट

२५ हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांसह राज्यातील ६९ नेते अडचणीत आले होते.

महाराष्ट्र बॅक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लिन चीट
SHARES

सिंचन घोटाळ्या पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९जणांना  पोलिसांच्या एसीबी विभागाने क्लिन चीट दिली आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांसह राज्यातील ६९ नेते अडचणीत आले होते.  

हेही वाचाः- प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेले असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ६९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात होतं. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. २५ हजार कोटींचा असल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकली गेल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केला आहे.

हेही वाचाः- मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अतिशय मनमानीने कर्ज वाटप केले होते. यामुळे बँकेला तब्बल १० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. या प्रकरणात अण्णा हजारे यांनी तीन वर्षांआधीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र आता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर त्यात शरद पवार यांचेही नाव घेण्यात आले. मात्र या प्रकरणात आता एसीबीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्याआधी एसीबीने जलसिंचन घोटाळ्याशी संबंधित चौकशीची ९ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली होती. या सर्व प्रकरणांचा अजित पवार यांच्याशी संबंध नसल्याचा दावा एसीबीने न्यायालयात केला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा