लग्नाचे आमीष दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पीडिताने गळफास लावून आयुष्य संपवले

आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडिताची पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. याशिवाय पोलिसांनी पीडित तरुणीचा तिरस्कार करून तिचा अपमान केला. यानंतर तिने घरी गेल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप पीडितांच्या नातेवाईकांनी केला

लग्नाचे आमीष दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पीडिताने गळफास लावून आयुष्य संपवले
SHARES

लग्नाचे आमीष दाखवून तरुणाने शारिरीक संबध ठेवून अचानक लग्नासाठी नकार दिल्याच्या नैराक्षेतून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना महाराष्ट्राच्या (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यात उघकीस आली आहे. आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडिताची पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. याशिवाय पोलिसांनी पीडित तरुणीचा तिरस्कार करून तिचा अपमान केला. यानंतर तिने घरी गेल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप पीडितांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे याप्रकरणाची अधिक चौकशी केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचाः- सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही- पियूष गोयल

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या एका मित्राच्या घरी घेऊन गेला होता. दरम्यान, आरोपीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडिताला लग्नाचे वचन दिले होते. पंरतु, पीडिताने लग्नाचा विषय काढला की, आरोपी तिला लॉकडाउनचा कारण देऊन हा विषय टाळत असे. यामुळे पीडित तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. पीडिताच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यात आरोपीने तिला लग्नासाठी दिल्याने ती आत्महत्या करत असल्याचे लिहले गेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः- तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या परीक्षेस मुकलात? आता 'या' तारखेला होणार पुर्नपरीक्षा

परंतु, ज्यावेळी पीडित तरूणी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली असताना पोलिसांनी तिचा अपमान केला. ज्यामुळे ती नैराश्यात गेली आणि आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलेले, असा आरोप पिडिताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांवर करण्यात आलेल्या आरोपांची शहानिशा केली जाईल. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबधित पोलिस ठाण्याच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पोलिस उपायुक्त विजयकांत सांगर यांनी सांगितले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा