अभिनेता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वादात राखी सावंतने उडी घेतल्यानंतर तिला धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. या प्रकरणी राखी सावंतने ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
२००८ मध्ये दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. हा वाद इतका चिघळला की त्यात अभिनेत्री राखी सावंतने उडी घेतली. ज्या गाण्याच्या चित्रीकरणावरून हे वादंग उठल त्या गाण्यावर अखेर राखी सावंतने नृत्य केलं होतं. राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीला खुलं आव्हान दिलं. आपण तनुश्रीला रिप्लेस केलं, याचा राग तनुश्रीला असल्याचं राखीने म्हटलं अाहे.
राखीच्या या वक्तव्यानंतर तिला अनोळखी फोन नंबरहून फोन येऊ लागल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं आहे. समोरील व्यक्ती या प्रकरणात ढवळाढवळ न करण्यासाठी तिला धमकावत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं. राखी सावंतने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाची सत्यता पडताळून पुढे कारवाई करणार असल्याच ओशिवरा पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -
सिगारेट आणून न दिल्यामुळे तरुणावर जिवघेणा हल्ला
गेट वे वरील प्रवासी बोटींवर चोरीचे डिझेल : तिघांना अटक