मुंबईतील मच्छीमार नगर परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. प्रविण पटेल, रिना पटेल, प्रभू पटेल अशी या मृतांची नावे आहेत. नैराश्येतून पटेल कुटुंबीयांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात अाहे.
मच्छीमार नगरजवळील झोपडपट्टीत प्रविण पटेल पत्नी रिना अाणि मुलगा प्रभू यांच्यासह राहत होते. पटेल लहानसहान काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांची परिस्थिती बेताचीच होती. अशातच पटेल यांच्या लहान मुलीला कॅन्सर झाला. तिच्यावर उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. काही महिन्यांपूर्वी मुलीचा मृत्यू झाल्याने पटेल कुटुंबीय नैराश्येत होतं. यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
या तिघांच्या मृतदेहाजवळ प्रविण पटेल यांनी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली अाहे. यामध्ये पटेल यांच्याशी भांडण करणाऱ्या व्यक्तींची नावे लिहिली आहेत. या प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -
घातवार! बेस्ट बसनं तरुणीला चिरडलं
अतिरेक्यांना पैसे पुरवणाऱ्या रमेशला पुण्यातून अटक