Advertisement

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश शुक्रवारपासून होणार निश्चित

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चित करण्याच्या प्रक्रीयेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना १६ आणि १९ आॅगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश शुक्रवारपासून होणार निश्चित
SHARES

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चित करण्याच्या प्रक्रीयेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना १६ आणि १९ आॅगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून १४ आॅगस्ट रोजी विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करून ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. त्यामुळं या विद्यार्थ्याना प्रवेश निश्चितीसाठी १९ आॅगस्ट रोजी शेवटची संधी असणार आहे.

'इतक्या' जागा उपलब्ध

या विशेष फेरीसाठी १ लाख २६ हजार ५६६ जागा उपलब्ध होत्या. पैकी ५६ हजार ३७५ जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील ४८ हजार ६६४ विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेश अलॉट करण्यात आले. त्यामुळे आता उर्वरित ७ हजार ७११ विद्यार्थ्यांनाही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. विशेष फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांत वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १६,७५२ होती. कला शाखेच्या ३,०९१ तर विज्ञानच्या ७,९७९ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ या फेरीची सुरुवात २० आॅगस्टपासून होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही फेरीमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, विशेष फेरीपर्यंत कोणतेही महाविद्यालय न मिळालेले, प्रवेश रद्द केलेले आणि प्रवेश नाकारलेले विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे.



हेही वाचा -

गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिता

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा