अवघ्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे ४० जणांच्या करीअरला ब्रेक लागला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे आणखी २० जणांना शासकीय नोकरीला हुकावे लागले आहे.
मुंबईत दररोज सरकारी आणि खासगी नोकऱ्यांसाठी परीक्षा होत असतात. त्यानुसार मंगळवारी १२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता पी. डब्ल्यू. डी ही सिव्हिल इंजीनियरच्या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार होती. वांद्रे परिसरातील थंडोमल शाहनी इंजीनियरिंग कॉलेज या केंद्रावर ही परीक्षा पार पडणार होती. या परीक्षेसाठी जळगाव, नाशिक, कोकण, पुणे यासारख्या विविध ठिकाणाहून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी आले होते.
मात्र मुंबईतल्या वाहतुक कोंडीमुळे आणि त्यातच अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज माहिती नसल्यानं परीक्षेस पोहचण्यास ५ ते १० मिनिटं उशीर झाला. परीक्षेचा रिपोर्टिंग टाइम ९.३० असल्यानं अनेक विद्यार्थी ९.३५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात पोहचले. मात्र उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपली चूक लक्षात घेत संबंधितांकडे परीक्षेला बसण्याची विनंती केली. पण ही विनंती चक्क धुकडावून लावण्यात आली. त्यामुळे हताश आणि निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडे (अभाविप) धाव घेतली. घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अभाविपनं आक्रमक पाऊल उचलत थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना ट्विट केलं आहे.
PWD Exam Mumbai, centre - Thadomal Sahani Engineering College, Civil Engineers are not allowed for exam due to just 5 minutes late and government is expecting from youngsters to build new INDIA. pic.twitter.com/SOTJcsluii
— Ajinkya Daulat Gajare (@gajare_ajinkya) February 12, 2019
यापूर्वी ३० जानेवारीला सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी न्यू इंडिया अॅश्यूरन्सच्या असिस्टंट आॅफिसरच्या पदासाठी पवईमधील एका परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार होती. परंतु जेव्हीएलआरवरील प्रचंड वाहतुक कोंडीमुळे तब्बल ४० जणांना या परीक्षेला बसता आल नव्हतं. आणखी किती विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक लागल्यानंतर शिक्षण विभागाला जाग येणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा